कर्करोगाच्या पेशी शरीराच्या इतर भागामध्ये पसरु शकतात किंवा रोगव्यापी करु शकतात,ज्यामुळे नविन अर्बुद निर्माण होऊ शकतात । कारण की कर्करोग पसरु शकतो, ह्यामुळे आवश्यक आहे की चिकित्सकाने झटकन शोधून काढले पाहिजे की अर्बुद बनले आहे, आणि हा कर्करोग आहे । कर्करोग आहे हे कळताच ह्याचा इलाज सुरु करता येतो । कर्करोगामुळे असे अनेक लक्षण दिसून येतात जे कर्करोग असल्याचा आभास देतात । काही महत्वपूर्ण लक्षणांचे विवरण खाली दिले जात आहे । कर्करोगामुळे असे अनेक लक्षण दिसून येतात जे कर्करोग असल्याचा आभास देतात । कोणतीही जखम जी अधिक काळापासून भरलेली नाही । छातीवर किंवा शरीरामध्ये इतर कुठेही गाठ किंवा सूज । शरीराच्या कोणत्याही भागातून किंवा अंगातून असामान्य रूपाने रक्त किंवा लस येणे । सतत अधिक काळापर्यंत खोकला येणे किंवा आवाज जड होणे/आवाज बसणे । अन्न गिळताना किंवा शौचास त्रास होणे, सतत अपचन किंवा बद्धकोष्ठता असणे । आतड्यांच्या सामान्य सवयीमध्ये बदल । तीळ किंवा मसाचा आकार, रंग किंवा रुपात अचानक बदल । तसे, असे लक्षण केवळ कर्करोगामुळेच निर्माण होत नाही, ह्यांचे अनेक कारण सुद्धा असू शकतात । ह्यामुळे ह्यांना पाहताच कर्करोग मानले नाही पाहिजे । दोन आठवड्यापर्यंत हे लक्षण राहिल्याने ह्यांना चिकित्सकाला दाखवा । ह्याच्यात कोणतीच शंका नाही की भारतामध्ये आढळणारे बहुतेक कर्करोग (६०-७० टक्के) रोगांची ताबोडतोब ओळख संभव आहे । आवश्यकता आहे, ह्याच्या बद्दल माहिती वाढवण्याची तसेच प्रत्येक व्यक्तीला आपली स्वतःची काळजी घेण्याची । कर्करोगाची ताबोडतोब ओळख करुन, ६०-७० टक्के कर्करोग रुग्णांना मुळापासून ठीक करणे आता संभव आहे । एवढेच नाही तर ताबोडतोब ओळख आणि झटकन उपचाराचे मूल्यसुद्धा उशीरा उपचाराच्या तुलनेत खूप कमी आहे । कर्करोगाच्या लक्षणांपासून सतर्क होण्याशिवाय सगळ्या स्त्रियांनी आणि पुरूषांनी नियमितपणे आपली तपासणी केली पाहिजे । सामान्य परीक्षणाद्वारे काही प्रकारच्या कर्करोगांची ओळख कुठल्याही चिन्हाच्या दिसून येण्या आधीच केले जाऊ शकते । कुठल्याही चिन्हाच्या दिसून येण्या आधीच चिकित्सक मुख, स्तन, गर्भाशयग्रीवा(सर्विक्स) त्वचा, मोठे आतडे, मलाशय, पुरस्थ-ग्रंथी (प्रोटेस्ट), अंडकोश(टेस्टिकल) इत्यादी कर्करोगांचा शोध लावू शकतात । ग्रीवाचा कर्करोग हा स्त्रियांमध्ये होणारा एक सर्वसामान्य कर्करोग आहे । भारतात स्त्रियांमध्ये होणारा एकुण कर्करोगांमध्ये ४० टक्के कर्करोग गर्भाशयग्रीवाचे असतात । लाळ ग्रंथी, लाळ धमनीद्वारे एक दूसर्यासशी जोडलेल्या असतात ।आणि एक सफेद पातळ द्रव बनवतात जीला लसीका म्हणतात । लसीका धमनींचे जाळे रक्त धमनींसारखे पूर्ण शरीरामध्ये पसरलेले असते । लसीका ग्रंथी कर्करोग पेशींना चाळून आपल्यापर्यंत मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न करतात । कर्करोग वाढल्यावर तो असे करु शकत नाही आणि लसीकाद्वारे कर्करोग शरीराच्या एका भागातून दूसर्याव भागापर्यंत पसरु लागतो । ह्या कारणांमुळे शल्यचिकित्सक सर्वसाधारणपणे गर्भाशयग्रीवाच्या आजूबाजूच्या लसीका ग्रंथींनासुद्धा काढून घेते । गर्भाशयग्रीवाचा कर्करोग रक्त प्रवाहाद्वारे सुद्धा पसरु शकतो । त्वचेमध्ये खासकरुन तीळ व मस कुठल्याही प्रकारची नविन वाढ किंवा बदलासाठी नियमितपणे तपासणी करावी । कोणत्याही बदलास लगेच चिकित्सकाला दाखवा । सामान्य चिकित्सा तपासणीच्या दरम्यान चिकित्सकाला व्वचाची सुद्धा तपासणी केली पाहिजे । मोठी आतडी आणि मलाशयच्या कर्करोगाचा लवकर शोध लावण्यासाठी नियमित चिकित्सक तपासणी करणे महत्त्वपूर्ण आहे । मलाशयाची तपासणी करण्यासाठी चिकित्सक हातमोजा घातलेले बोट मलाशयात टाकून, रोगाचे निदान लावू शकतात । ५० वर्षाच्या वयानंतर, प्रत्येक व्यक्तीची वार्षिक तपासणी आवश्यक आहे । मोठ्या आतड्याच्या कर्करोगामुळे मलाबरोबरच रक्त येऊ शकते । निश्चित निदानासाठी विस्तृत तपासणी आवश्यक आहे ५० वर्षाचे आयुष्य पार करणार्या व्यक्तीचे मलाशय आणि मोठ्या आतड्यांची तपासणी करण्यासाठी चिकित्सकाला ३ ते ५ वर्षाच्या अवधीमध्ये अवग्रहाभ (मलाशयाची द्विनेत्री तपासणी) केली पाहिजे । चिकित्सकाद्वारे पुरःस्थ ग्रंथिच्या कर्करोगाचा प्राथमिक स्थितीमध्ये शोध लावण्याची अत्यंत विश्वसनीय पद्धत चढलेल्या बोटांचे परिक्षण आहे । ४० वर्षापेक्षा जास्त आयुच्या सगळ्या व्यक्तींची वार्षिक तपासणी आवश्य केली गेली पाहिजे । वार्षिक तपासणी अवश्यक पुरःस्थ ग्रंथीमध्ये अनियमित किंवा असामान्य कठोर क्षेत्राचा शोध लागू शकतो । आणि माहिती केली जाऊ शकते की हा अर्बुद आहे की नाही । अंड ग्रंथीच्या कर्करोगाचा शोध जास्त तर माणूस स्वतः करु शकतात । प्रत्येक मास स्वतः तपासून पुरुष आपल्या अंड ग्रंथींमध्ये परिवर्तनाचा शोध लावू शकतात । गरम पाण्याने आंघोळ करताना किंवा त्याच्यानंतर, जेव्हा अंडकोश शिथिल असते, त्याच्या तपासणीची सर्वात चांगली वेळ असते, कारण की ह्या परिस्थितीमध्ये कोणत्याही परिवर्तनाचा सहजतेने शोध लावला जाऊ शकतो । अंड ग्रंथीच्या स्वंय परीक्षणाने जर सूज, गाठ किंवा कोणत्याही इतर प्रकारच्या दोषांचा, खासकरुन अंड ग्रंथीला स्पर्श केल्याने असामान्य वेदना, वेदना किंवा मोठेपणा जाणवत असेल तर चिकित्सकाला दाखवले पाहिजे । चिकित्सकाद्वारे अंड ग्रंथींची तपासणीसुद्धा व्यक्तीच्या नियमित वार्षिक चिकित्सक तपासणीचा भाग असला पाहिजे । तोंडाच्या कर्करोगाच्या चिन्हांसाठी तोंडाची नियमितपणे तपासणी आवश्यक आहे । तोंडाच्या ऊतकांचे परिवर्तन कर्करोगाची प्राथमिक स्थिती होऊ शकते । तोंडाच्या ऊतकांच्या परिवर्तनाला सहजपणे पाहिले आणि अनुभवले जाऊ शकते । दंत चिकित्सकाने प्रत्येक रूग्णाच्या तोंडाची संपूर्ण पणे तपासणी करावी । हिरड्या, ओठ आणि गाल ह्यांच्या रंगात होणार्या परिवर्तनावर लक्ष दिले गेले पाहिजे । खुरण्ड (खपली) भेग, सूज, रक्त स्त्राव तोंडाच्या कोणत्याही भागामध्ये गाठ किंवा लाळ ह्यांबद्दल विशेष लक्ष दिले पाहिजे । चिकित्सक किंवा दंतचिकित्सकाकडे जाऊन तपासणी अवश्य करुन घ्या । जर तुम्ही तंबाखू, पान, पानमसाला किंवा जर्द्याचे सेवन करत असाल तर तपासणी करणे आवश्यक आहे । तुम्ही स्वतः सुद्धा आरशात तुमचे स्वतःहाचे तोंड बघू शकतात आणि कोणतेही परिवर्तन दिसू लागताच चिकित्सकाचा सल्ला घेऊ शकता । सगळ्या महिलांना स्तनाचा स्वतः परीक्षणाचा ढंग जाणून घेतला पाहिजे । आणि प्रत्येक महिन्याला आपल्या छातीचे स्वतः परीक्षण केले पाहिजे । मासिकस्त्राव अवधीच्या काही दिवसानंतर स्तनांचे परीक्षण करणे योग्य असते । जेव्हा स्तन मोठे किंवा दुखण्याची शक्यता अजिबात नसते । मासिकस्त्राव बंद झाल्यावर सुद्धा स्त्रियांनी प्रत्येक महिन्याला स्वतः परीक्षणासाठी एक दिवस (कधी ही) नियुक्त केला पाहिजे । ४० वर्षापेक्षा जास्त वयाच्या स्त्रियांसाठी हे परीक्षण खासकरुन महत्त्वपूर्ण असते । ४० वर्षापेक्षा जास्त वयामध्ये स्तन कर्करोगाचा धोका वाढतो । जर कोणत्याही स्त्रीच्या स्तनात गाठ किंवा कोणत्याही प्रकारच्या परिवर्तनाचा आभास होतो तर तिला चिकित्सकाशी संर्पक केला पाहिजे । स्तनाच्या जवळजवळ ८० टक्के गाठी कर्करोग नसतात । परंतु एक चिकित्सकच ह्याची बरोबर ओळख करु शकतो । स्त्रियांची चिकित्सक तपासणी करता वेळी स्तनामध्ये गाठ किंवा स्तन खूप मोठे झाल्यासारखे अशा कोणत्याही असामान्य परिवर्तनाची तपासणी आवश्य केली गेली पाहिजे । स्तनाचा मैमोग्राम अर्थात एक्सरे/क्ष-किरण अर्बुद किंवा परिवर्तनाचा शोध लागला जातो । ज्याच्याने एक चिकित्सक सावधगिरीने तपासणी करुन सुद्धा पकडू शकत नाही । ४० वर्षाच्या वयानंतर प्रत्येक स्त्रीला १ ते २ वर्षाला मैमोग्राम केला पाहिजे । स्त्रीचे वय ५० वर्ष झाले तर प्रत्येक वर्षी मैमोग्राम करणे आवश्यक आहे । ज्या महिलांच्या आईंना, बहिणींना, मावश्या इत्यादींना कर्करोग आहे त्यांना २५-३० वर्षाच्या आयुपासूनच वार्षिक स्तनाची तपासणी तसेच मैमेग्राफी केली पाहिजे । कर्करोगाची तपासणी विकृतीशास्त्र परीक्षणाद्वारे केली जाते । एफ । एन । ए । सी ।, बायोपसीच्याद्वारे ह्या पेशींना सूक्ष्मदर्शकयंत्रामध्ये पाहिले जाते । इतर चाचणीनेसुद्धा कर्करोगाचा शोध लावला जाऊ शकतो । जसे एक्सरे, सी । टी । स्कॅन, एम । एम । आर ।, अल्ट्रासाउड प्रशिक्षण तपासणी केंद्राची सूची जिथे कर्करोगाचे प्रशिक्षण केले जाते । शल्य चिकित्सक कर्करोगाच्या चरणावर निर्भर असते । जर कर्करोग मर्यादित आणि प्राथमिक चरणात आहे तर प्रभावित क्षेत्राच्या बरोबर काही सामान्य क्षेत्रामध्ये सुद्धा हटवले जाते । प्रयत्न केला जातो की कर्करोगाचा कोणताही कण राहता कामा नये । जर कर्करोगाने इतर क्षेत्रांमध्येसुद्धा प्रवेश केला आहे तर कर्करोगाचा आकार कमी करण्यासाठी त्याच्यापासून निर्माण होणार्याय त्रासाला कमी करण्यासाठी शल्य चिकित्सा केली जाते । क्ष-किरणाद्वारे कर्करोग पेशींना जाळले जाते । रेडियों धर्मीच्या आधी कर्करोगाचे क्षेत्र, फैलाव रुग्णाची क्षमता, कर्करोगाच्या आधारावर क्ष-किरणाची वेळ, चरण, क्षेत्र शक्ती ह्यांचे आंकलन केले जाते । पुन्हा व्वचावर चिन्ह लावले जाते । क्ष-किरणाच्या दरम्यान कोणत्याही दुसर्या व्यक्तीचा त्या खोलीमध्ये प्रवेश वर्जित आहे । रेडियों धर्मी क्ष-किरणापासून कोणताच त्रास होत नाही । कधी-कधी व्वचा लाल होऊ शकते किंवा रुग्णाला उल्टी होऊ शकते । औषधांद्वारे काही कर्करोगाला पूर्णपणे ठीक केले जाऊ शकते जसे रक्ताचा कर्करोग आणि गाठींचा कर्करोग हे औषध कर्करोग पेशींना नष्ट करतात । सामान्य पेशीसुद्धा ह्या औषधाने प्रभावित होऊ शकतात । पेशींच्या प्रभावित होण्यामुळे रुग्णाचे केस, नख पडू शकतात । रक्त कमी होऊ शकते ज्याच्यामुळे थकवा जाणवतो । जर रुग्ण नियमित सायकल, बरोबर प्रमाणात औषध घेतले आणि स्वास्थ्य आहार खाल्ला तर पूर्णपणे ठीक होतो । उपचाराच्यावेळी सतत रक्ताची तपासणी केली पाहिजे, स्वच्छ पाणी आणि स्वच्छ जेवण घेतले पाहिजे । कोणत्याही आजारी व्यक्तीबरोबर बसले नाही पाहिजे कारण की औषधांनी प्रतिरोधक शक्ती बरीच कमी होते । कर्करोगाच्या नाईलाज रुग्णांना पेलियेटिव केअर मध्ये ठेवले जाते ।ज्याच्यामुळे त्याच्या शारीरिक, मानसिक, त्रास कमी करता येतो । रुग्णालयातील यादी जिथे कर्करोगाच्या उपचाराची सोय आहे । कर्करोगापासून संरक्षण तसेच जागरूकता । तंबाखू व तंबाखूंशी संबंधित वस्तूंपासून संरक्षण किंवा परित्याग/प्रदूषण नियत्रंण । शुद्ध साधारण शाकाहारी आहार, प्रत्येक दिवशी ताज्या हिरव्या पालेभाज्या व ताज्या फळांचे सेवन करा । प्रत्येक दिवशी कमीत कमी आर्धा तास व्यायाम/वेगात चालणे/खेळणे । अधिक मिरची तळलेले, भाजलेले, मांस, तूप, दारु ह्यांमध्ये कमी करणे १८ वर्षाच्या आधी शारीरिक संबंध बनवू नका । आपल्या जोडीदाराबद्दल एकनिष्ठ राहणे/जनन अंगांना स्वच्छ ठेवणे । बालकाला बर्यारच काळापर्यंत आपले दूध पाजणे । संभोगच्यावेळी निरोधचा वापर करा । समाजात जागरुकता धूम्रपान व तंबाखुपासून होणार्याय नुकसानाची महिती द्या । स्वतःला स्वच्छ ठेवण आणि वाईट सवयींपासून दूर ठेवणे । सरकारी व गैर-सरकारी विभाग समाजिक संस्था ग्रामीण व शहरी जीवनशैलीला सुधारण्यासाठी प्रेरित करणे । स्तन व मुख ह्यांची तपासणी करण्यासाठी माहिती देणे व ३५ वर्षांनंतर वर्षातून एकदा आपल्या आरोग्याची तपासणी करून घेणे । बालवाडी कार्यकर्तीला कर्करोगासंबंधी लक्षणे व स्व स्तन, मुखाची तपासणी, संरक्षणसंबंधी माहिती दिली गेली आहे । कनिष्ठ विद्यालयात कर्करोग, त्याची लक्षणे, तंबाखुचे तोटे, स्व-स्तन संरक्षणासंबंधी माहिती दिली गेली आहे । कर्करोग नोंदणीकृत राज्याच्या सर्व चिकित्साकेंद्रांत अधिक्षकाने बेस रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, महिला रुग्णालय, वैद्यकीय विद्यालय व खाजगी रुग्णालय ह्यांना एक कर्करोग रजिस्ट्रार बनवायला सांगितले आहे । कर्करोग नोंदणी कार्यालयात ते आपल्या बाह्य विभागात आलेले कर्करोगीची नोंदणी करतील व प्रत्येक महिन्यात हा अहवाल महानिदेशालयात पाठवतील । कर्करोग नोंदणी कार्यालयात आपल्याला कळेल की राज्यात कर्करोगाने पीडित व्यक्तिंची संख्या किती आहे व कोणत्या विभागात कोणता कर्करोग जास्त प्रमाणात आढळतो । कांजण्या (चिकन पॉक्स/व्हॅरिसेला) कांजिण्या ह्या विषाणूजन्य आहेत ज्या वेरिसिला (व्ही । जेड । व्ही ।)च्या संपर्कातून होतात । ताप व संपूर्ण शरीरावर विशिष्ट प्रकारच्या पुटकुळ्या येणे ही कांजिण्यांचे लक्षणे आहेत । हवेतील निहित थेंबांद्वारे विषाणू सामान्यपणे एका व्यक्तिकडून दुसर्याल व्यक्तिमध्ये पसरतो । कांजिण्या झालेल्या व्यक्तीच्या खोकल्याने किंवा शिंकल्याने सभोवतालच्या परिसरात शिंतोडे उडाल्याने हा आजार पसरतो । कांजिण्या किंवा हर्पिसच्या थेट संर्पकाद्वारे सुद्धा हे पसरु शकतो । कारण की ओल्या जखमेत संसर्गजन्य द्रव असते । काही गोष्टीत हे संसर्गित गर्भवती आईकडून तिच्या न जन्मलेले किंवा नवजात शिशुलासुद्धा लागू शकते । पुटकुळ्या येण्याच्या आधी काही दिवसापर्यंत आणि सगळ्या जखमांवर खपली तयार होण्याच्या आधीपर्यंत म्हणजे त्याच्या सुकण्यापर्यंत कांजिण्या सर्वाधिक स्पर्शजन्य असतात जे बहुधा चट्ट्यांना आरंभ होण्याच्या एक अठवड्यानंतर होतात । ताप, अंग थरथरणे, ओकारी आणि उल्टी सगळ्यात स्वच्छ और सुविख्यात लक्षण आहे हे पुटकुळ्या आणि अत्यंत खाजयुक्त चट्टे येणे । जास्त प्रमाणातील मुलांना २००-३०० पुटकळ्या निघतात ज्यानंतर खपली किंवा पापुद्रा बनतो । कांजिण्या मुलं आणि मोठ्या, पुरूष आणि महिला ह्या दोघांनाही होऊ शकतात । जास्त प्रमाणातील लोक लहानपणी किंवा किशोरावस्थाच्या दरम्यान कधी ना कधी कांजिण्यांचा शिकार होतात । परंतु अगोदर कधी कांजिण्या न झालेल्या प्रौढ जर अशा केसीच्या संपर्कात येतात तर त्यांना संसर्गाचा धोका असतो व प्रौढावस्थेत त्यांना कांजिण्या होऊ शकतात । मुलांच्या तुलनेत कांजिण्या किशोर आणि वयस्कर ह्यांमध्ये अधिक गंभीर असतात । ताप हा अधिक जास्त काळ रहातो । संक्रमित व्यक्तिंना शाळा किंवा कामापासून दूर ठेवल्याने विषाणुंचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत मिळते परंतु लक्षीकरण हा कांजण्यांच्या त्रासापासून वाचण्याचा एक प्रभावी उपाय आहे ।